Saturday 30 November 2019

मुलांना काय हवे असते..!

मुलं ही स्वावलंबी नसतात, मुलांना शेवटपर्यंत आईवडील आणि आईवडिलांनासुध्दा  मुलं  सोबत हवी असतात. ते  एकमेकांवर अवलंबून राहतात. त्याच्यां  आयुष्यात  त्यांना  काही  मिळालं नाही,तर  आईवडिलांना दोष देतात,त्यांच्याकडे लहानसहान हट्ट करतात. मोठं झाल्यानंतर आईवडिलांचा सांभाळ ही करीत नाही.  अनेक कुटुंब असे असतात जिथे फक्त  रक्ताच नात असतं.म्हणून एकत्र राहतात. कोणाला  कोणाविषयी  फारशी आपुलकी नसते. नातं कायम ठेवायच एवढ्यासाठी एकत्र असतात फक्त.
पूर्वी मनाचा तेवढा विचार केला जात नव्हता. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनाचा विचार करीत असते.  त्यामुळे कुटुंबात ताणतणाव  जास्तच वाढलेले दिसतात. फक्त संपत्ती ,पैसा  यापेक्षाही  काहीतरी हवं असतं आजच्या पिढीतील मुलांना,  त्यामुळे ते सतत अस्वस्थ असतात. कुटुंबात  सर्वांना बांधून ठेवणारा  सर्वात महत्वाचा धागा असतो तो म्हणजे प्रेम . कुटुंबातील प्रत्येकाचे  प्रत्येकावर प्रेम असतं ; परंतु ते व्यक्त  कशातूनही करता येत नाही.  कारण कुणाला कुणासाठी वेळच नसतो.  प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतात.   मुलांना आईवडिलांचा  सहवास हवा  असतो तेव्हा तो त्यांना मिळत नाही  आणि आईवडिलांना जेव्हा  मुलांचा सहवास  हवा असतो,तेव्हा  मुलं त्यांच्यापासून दूर असतात. आजच्या मुलांना स्वातंत्र्य हवं असतं त्यांना कुटुंब ही हवं असतं, पण  ते रक्तांच नात आहे म्हणून नाही तर मनाने ,जवळ नाही असं त्यांना वाटतं  खरंतर एकमेकांच्या सहवासाच्या अभावामुळे  त्यांना असं वाटतं . पूर्वी आईवडील जवळ नसले ,तर आजीआजोबा ,काका काकू ,  आत्या त्यांची मुलं  हा सर्व गोतावळा घरात असायचा.  मूल जरा रडायला लागल की, एवढी सर्व माणसं  त्याचे लाड करायची. त्यामुळे एकटेपण नावाची गोष्ट तेव्हा नव्हती.
आज तर सिंगल चाईल्डचाच  काळ आहे.  त्यामुळे त्यांना  सोबत कोणाचीच नसते . मग त्यांच वागणं बदलत जात ,  ते एकटं पडत जात ,त्याचवेळी मनाचा विचार जास्त करू लागत व अस्वस्थ होत जात. कारण आज मुलांच्या गरजा बदलल्या आहेत , त्यांना प्रेम हवं असत ,माया करणारी माणसं हवी असतात.  पूर्वी हे सहज मिळत  असल्यामुळे  ती त्यांची गरज आहे , या पातळीवर विचार करण्याची संधी कधीच मिळत नव्हती . त्यामुळे त्यांच्या मनाचे नेमक काय बिनसलय  हे त्यानांही  कळत नाही त्यामुळेच डिप्रेशन म्हणजेच विमनस्कता  याचे प्रमाण  मुलांमध्ये वाढत चाललय . जो शब्द पूर्वीच्या काळी  मुलांना माहितही नसायचा  आज डिप्रेशनने म्हणजेच विमनस्कतेने  त्यांच्याभोवती  वेढा घातला आहे.


मिलिंद आरोलकर -

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन

२३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल: आज जागतिक पुस्तक दिन. संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा...